Posts

भारतीय रेल्वे वेळेवर का येत नाही ?

 "प्रवाश्यांनो कृपया लक्ष द्या, भारतीय रेल नेहमीप्रमाणे उशीरा येईल. तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल आम्हाला कुठलीही खंत नाही,याची सर्वांनी नोंद घ्यावी." आता असा संदेश रेल्वे स्थानकांवर वाजवायला पाहिजे. काही अपवाद सोडले तर कुठलीही रेल्वेगाडी वेळेवर येत नाही. जग वेगात पुढे जात असताना आपण सुस्तपणे प्लेटफार्मवर नुसतेच थांबून आहोत. वेळेचे महत्व जपानकडून शिकायला हवे. तिथे अर्धाही मिनीट उशीर झाला तर संबंधित व्यक्तीद्वारे प्रवाश्यांची माफी मागितली जाते. भारतीय रेल्वे मात्र प्रवाशी हे बिनकामाचे आहेत, असे गृहीत धरून त्यांच्या त्रासाबद्दल कधीच दखल घेताना दिसत नाही. पाच दहा मिनिटाचा उशीर तेही अत्यावश्यक कारणांमुळे होत असेल तर ते ग्राह्य आहे, पण कर्मचाऱ्यांच्या वेळखाऊ स्वभाव, सेवाभावाचा अभाव आणि सेवेप्रती गंभीर नसल्यामुळेच रेल्वे वेळेवर धावत नाही. निर्धारीत वेळेपेक्षा दहा मिनिट उशीरा येणाऱ्या गाडीची वाट पाहत रेल्वेच्या बाकावर मी बसून आहे. पण दहा मिनिटे झाली, अर्धा तास झाला तरी येणाऱ्या गाडीला प्लेटफार्मच मिळत नाही. आता तीच गाडी सव्वा तास उशीरा येईल म्हणून रेल्वेकडून प्रदर्शित केल्या जात...

थ्यँक यु JAIPAN !

Image
थँक यु jaipan !                   तब्बल अठरा वर्षानंतर तिची साथ सोडावी लागली. काही काळ घरचे वातावरण थोडेसे दुःखी, थोडेसे हळवे झाले. तिने अनेक आनंदाच्या प्रसंगी आम्हाला भक्कम साथ दिली. आपल्या गोड आवाजात घरात आनंद पसरला. तिनेच प्रत्येक रविवार खास केला. तिच्याच साक्षीने अनेक सणं, निमित्त साजरी झालीत. आज तिची जागा सुजाता घेत आहे. दुःख-आनंद असा हा प्रसंग आहे. तिच्या प्रदीर्घ सेवेबद्ददल मनापासून आभार! थँक यु जेपान द मिक्सर!                होय, मी Jaipan Mixer विषयी बोलत आहे. अठरा वर्षापूर्वी ती आमच्या घरात वाजत गाजत आली. २३ मे २००४ मध्ये माझ्या  लग्नात पत्नीच्या एका जवळच्या नातेवाईकाने आंदन स्वरूपात तिला भेट (माझ्याकडील नातेवाईकांनी ताट, गंज, स्टीलचा डबा तत्सम वस्तूच भेट स्वरूपात दिल्या. त्याबद्दल मी त्यांचा फार ऋणी आहे.) दिली. हळुवार तीने स्वयंपाकघरात आपले बस्तान बसवले. किरायाची खोली ते स्वतःचा घर अशा प्रवासात ती आमच्या सोबत कायम राहिली.  जेव्हा आम्ही घर बांधायला सुरूवात केली तेव्हाच माझ्या...

झुंड - नाम ही काफी है.

Image
झुंड - नाम ही काफी है.              बहुचर्चित तथा बहुप्रतिक्षित "झुंड" हिन्दी चित्रपट ४ मार्चला भारतभर प्रदर्शित झाला. नागराज मंजुळेचा चित्रपट म्हणजे नवे काही असेलच अशी प्रेक्षकांची भावना असते. प्रेक्षकांची ही अपेक्षा नागराजने पूर्ण केली आहे.              नागपूर येथील प्रा. विजय बारसे यांनी  फुटबालद्वारे झोपडपट्टीतील मुलांचे आयुष्य बदलवले. त्यांनी स्लम साॕकर नावाची संस्था स्थापन केली. या माध्यमातून त्यांनी झोपडपट्टीत वास्तव्य करणाऱ्या मुलांसाठी फुटबाल या खेळाचे मंच उपलब्ध करून दिले. त्यांना वाईट व्यसनाकडून खेळाकडे आकर्षित केले. झुंड हा चित्रपट प्रा. बोरसे यांच्या  आयुष्यावर  आधारित आहे.                    झोपडपट्टी म्हटले की सर्वसामान्य लोकांचा दृष्टिकोन बहुतेक वाईटच असतो. येथे नशा करणारी, चोऱ्या व मारामारी करणारी मुलं असतातही, पण त्यामागील कारणांचा  शोध कोणी घेताना दिसत नाही. झोपडपट्टी ...

दोरीवरचा खेळ

Image
              आज रस्त्याच्या कडेला दोरीवरून चालण्याचा खेळ सुरू होता. १०-१२ वर्षाची मुलगी दोरीवर आपली कला सादर करत होती. काही लोकं दुरूनच हा खेळ बघत होते. रखरखती ऊन तसेच आपण जवळ गेलो तर आपल्याला पैसे द्यावे लागतील, हाही यामागे कारण असावा.             मी गाडी थांबवली. कोणत्या गावचे म्हणून विचारले. मुलीच्या आईने, आम्ही बिलासपूरचे आहोत, एकदम बारक्या आवाजात सांगितले. दोन मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार. वडील दोरीच्या खाली उभा होता. मुलीला सावरण्यासाठी असेल. मुलगी नुकतीच दोरीवरचे खेळ करायला लागली होती. म्हणून बापाला थोडी भीती वाटत होती. तो तिच्यावर नजर रोखून होता. तिने दोरीवरून एक फेरी पूर्ण केली. आईच्या चेहऱ्यावरील निस्तेज भाव पाहून मी विचारलो, ताई तुम्हाला बरं नाही का?  "नाही जी. सकाळपासून काही खाल्ले नाही. या ऊनात बसून चक्कर आल्यासारखी वाटते."            गावातील लोकं फक्त पाहणारे होते. दोन दिवसांपासून त्यांना खेळ करून फक्त  पन्नास रुपये मिळाले असतील. तिसऱ्या दिवशी मोठ्या उम...

आता या मैत्रीची समीक्षा व्हायलाच हवी

Image
  आता या मैत्रीची समीक्षा व्हायलाच हवी               संपूर्ण जगात आज युध्द विषयक चर्चांना उधान आले आहे. त्यामागे युक्रेन व रशिया दरम्यान चांललेले युध्द हे कारण आहे. रशिया हा  युक्रेनला धडा शिकवण्याच्या मुजोर जिद्दीने सैनिक कार्रवाईच्या नावाखाली युक्रेनशी युध्द सुरू केले. युध्द हे कधीच फायद्याचे नसते. आर्थिक आणि जिला कधीच भरून काढता येत नाही ती जिवित हानी मोठ्या प्रमाणात होते. जगाला दोन महायुध्दांचा अनुभवही आहे. त्याआधी राजेशाही व्यवस्था असताना युध्द व्हायचे ते आपल्या देशाच्या सिमा वृध्दींगत करण्यासाठी. ती व्यवस्था संपुष्टात आल्यानंतर बहुतेक सिमा ठरल्या गेल्या. काही देशांमध्ये सिमा विषयक वादही  सुरू आहेत. याच वादातून बहुतेककरून युध्दजन्य परिस्थिती निर्माण होत आहेत. युक्रेन हा देश पूर्वी संयुक्त रशियाचा भाग होता. त्यापूर्वी तो १७ व्या आणि १८ व्या शतका दरम्यान  एक देश म्हणून समृद्ध झाला पण शेवटी  पोलंड आणि रूसी साम्राज्यात  विभाजित झाला. रूसी क्रांति नंतर आत्मनिर्णयासाठी एक यूक्रेनी राष्ट्रीय आंदोलन निर्माण झाला.  ज्याने...

जयंती: वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट

Image
  जयंती:  वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट                 चित्रपट नेहमीच भारतीय समाजाला भूरळ पाडत आला आहे. लहानमोठ्यांचा हा आवडीचा विषय. प्रेमकथांची भरमार असणाऱ्या भारतीय सिनेमात राज कपूर यांनी काही हिंदी चित्रपटांमधून समाज वास्तव मांडले आहे. सलीम-जावेद जोडीने बदलत्या जमान्यानुसार डॕशींग हीरोपटाच्या कथा लिहिल्या. सत्यजीत रे, श्याम बेनेगल, राकेश मेहरा, मेहमुद यांनी नवे काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शेकडो वर्षाचा इतिहास असलेल्या भारतीय हिंदी चित्रपट विश्वाला असे बोटावर मोजता येईल, एवढेच नावं सांगता येणे, ही आपल्या सिनेमाची शोकांतिका आहे. काळानुसार बदलने जीवंतपणाची लक्षण आहे, पण हिन्दी सिनेमा मात्र सडक्या पाण्यात तरंगत राहिला. काहिंनी या भिंती तोडून नदीसारखे प्रवाहित होण्याचा प्रयत्न केला. आज  नवनव्या प्रयोगांसह समाजवास्तव घेऊन चित्रपट येताहेत, पण ते प्रादेशिक आहेत. तमीळ, मराठी मधून आशादायक चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'जयंती' नावाचा मराठी चित्रपट जीवंतपणा देणारा असा आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षाच्या निर्बंधानंतर...

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं

Image
कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं            आज दि. १६ आगष्ट २०२१. कालच आपण सारे भारतीय आपला ७५ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा केला. आज अफगानिस्तान संपूर्णपणे तालिबानच्या कब्ज्यात आल्याची बातमी टि.व्ही.वर पाहिली. एकीकडे स्वातंत्र्याचा आनंद साजरा होतोय तर दुसरीकडे स्वातंत्र्य गेल्याचा. गेली २० वर्षे अफगानीस्तानात लोकशाही सरकार होते. ते आज पुन्हा संपुष्टात आले. लोकशाही पुरस्कृत देश हे भारताला अधिक प्रिय. कारण जगातील  सर्वात मोठी लोकशाही आपल्याच देशात नांदत आहे. ही पार्श्वभूमी असल्याने सारेच लोकशाहीला मानणारे देश आपले मित्रच. असे असले तरी अफगानीस्तान आणि आपले नाते फार जुने. एकेकाळी अफगानीस्तान मौर्य साम्राज्याचा समाविष्ट होता. म्हणजे विशाल अखंड भारताचा भाग असलेला अफगानीस्तान या दृष्टीनेही आपल्याला जवळचा वाटतो. या जवळीकतेला   मात्र दहशतवादी संघटनांद्वारे फट पाडण्याचा नेहमीच प्रयत्न होत गेला. ही जवळीकता अधिक घट्ट होत असतानाच अमेरिकेतील सैन्यानी अफगानीस्तानातून काढता पाय घेतला आणि तिथले वासे फिरले. तालिबानने अवघ्या दोन महिन्यात संपूर्ण अफगान...